आय ए एस मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न – उदाहरण – IAS Interview Questions In Marathi

आय ए एस मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न – उदाहरण – IAS Interview Questions In Marathi

आपल्या भारत देशात सिव्हील सर्विस जाँब प्राप्त करणे ही एक खुप अभिमानाची आणि प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते.आज देशभरातुन लाखो विदयार्थी आपले पदवीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर युपीएससीच्या तयारीला लागत असतात.

कारण आज प्रत्येकाला अशी नोकरी हवी असते ज्यात आपल्याला मान प्रसिदधी,प्रतिष्ठा आणि पैसा या चारही गोष्टी प्राप्त होतील.युपीएससीमध्ये एकुण तीन टप्पे असतात पहिले पुर्वपरिक्षा(prelims exam),मुख्य परिक्षा(mains exam),आणि तिसरा टप्पा असतो मुलाखतीचा जो फार महत्वाचा मानला जातो.

कारण असे खुप उमेदवार असतात जे पुर्वपरिक्षा(prelims exam),मुख्य परिक्षा(mains exam),यामध्ये यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन जात असतात.पण मुलाखतीत त्यांना अपयश प्राप्त होत असते.

याला कारण मुलाखतीत देश आणि जगाशी संबंधित सामान्य ज्ञानासंबंधित प्रश्न विचारण्यासोबत असे काही प्रश्न विचारले जात असतात?ज्यात आपल्या बौदधिक तार्किक आणि वैचारिक पातळीची,चातुर्याची क्षमता बघण्यासाठी परीक्षा घेतली जात असते.ज्याची उमेदवारांना कुठलीही कल्पणा देखील नसते.

आणि त्यातच आपण जर कुठलाही विचारविनिमय न करता जर कुठल्याही प्रश्नाचे एकदम तडकाफडकी उत्तर जर दिले आपले उत्तर चुकण्याची दाट शक्यता असते.

म्हणुन अशा वेळी आपण घाई न करता डोके शांत ठेवून आपल्या बौदधिक तार्किक आणि वैचारिक पातळीचा,चातुर्याचा कस लावून मुलाखत घेत असलेल्या व्यक्तीचा असा प्रश्न विचारण्यामागचा मुख्य हेतु लक्षात घेऊन आपल्यापासुन त्याला अपेक्षित असलेले योग्य उत्तर द्यायला हवे.

यासाठी सँपल म्हणुन आजच्या लेखात आपण आय ए-एस मुलाखतीत विचारल्या जात असलेल्या काही विविध प्रकारच्या महत्वाच्या प्रश्नांचा,त्यांच्या स्वरुपाचा आणि त्यांच्या योग्य उत्तरांचा आढावा घेणार आहोत.

आय ए एस मुलाखतीत विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न कोणकोणते आहेत?- IAS INTERVIEW QUESTIONS IN MARATHI

आय ए एस मुलाखतीत विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत-

1)कुठल्याही आरोपीला फासावर चढवून झाल्यानंतर मृत्युनंतर त्याच्या मृतदेहासोबत काय करतात?

-कुठल्याही गुन्हेगाराला जेव्हा फाशीची शिक्षा सुनावली जात असते.तेव्हा त्याला फासावर लटकवल्यानंतर किमान एक आणि कमाल दोन तासांसाठी फासावर लटकवण्यात येत असते.

मग तब्बल दोन तास गुन्हेगाराला फासावर लटकवून झाल्यानंतर डाँक्टरांना तसेच वैद्यकीय चिकित्सकांना बोलवले जाते.

See also  ऑनलाईन मोफत मराठी पुस्तके - List of 5 free websites

मग जेव्हा डाँक्टर तसेच वैद्यकीय चिकित्सकांनी त्या गुन्हेगाराला पुर्णपणे मृत घोषित केल्यावर त्याच्या बाँडीला अखेरीस पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात येते.

2) जर आपण एखादा लाल दगड हा निळया समुद्रात जर टाकला तर काय होईल?

-जर आपण एखादा लाल दगड हा निळया समुद्रात जर टाकला तर तो पाण्यात पडल्यामुळे ओला होईल.

(इथे आपण हे लक्षात घ्यायला हवे की कुठल्याही समुद्राचा रंग निसर्गत निळसरच असतो आणि त्यात जर आपण दगड टाकला तर तो दगड ओला होणार तसेच त्या समुद्राच्या खालच्या तळाशी जाऊन लागेल)

3) एखादी व्यक्ती 10 दिवस न झोपता कशी राहु शकते?

-एखादी व्यक्ती 10 दिवस न झोपता आरामशीर राहु शकते.यात कुठलीच अडचण नाही.कारण मुळातच आपण नेहमी रात्री झोपत असतो.

आणि प्रश्न आपल्याला असा विचारला गेला आहे की एखादी व्यक्ती 10 दिवस न झोपता कशी राहु शकते?आणि निसर्गत प्रत्येक व्यक्ती ही शरीराला विश्रांती देण्याकरीता रात्रीच झोपत असते आणि दिवसा आपण आपली जीवनावश्यक कामे करत असतो.

4) मी जर तुमच्या बहिणीला माझ्यासोबत पळवून घेऊन गेलो तर अशावेळी तुम्ही काय करशाल?

-तुमच्यासारखा मोठा अधिकारी जर माझ्या बहिणीला लाईफ पार्टनर म्हणुन प्राप्त होत असेल तर मला खुप मनापासुन आनंद होईल.

(इथे सामान्यता पाहायला गेले कुठलाही भाऊ हेच उत्तर देईल की मी तुझा जीव घेईन,तुझे हात पाय तोडुन टाकेन किंवा त्या व्यक्तीची रागाच्या भरात मागे पुढे पाहणार नाही.

पण इथे मुलाखत घेत असलेल्या व्यक्तीला आपल्या तार्कीक क्षमता,बौदधिक चातुर्याची,वैचारीक क्षमतेची आणि संयमाची परीक्षा घ्यायची असते की अशा परिस्थितीत आपण एक जबाबदार अधिकारी म्हणुन काय प्रतिक्रिया देऊ).

5) अशी कुठली गोष्ट आहे जी आपण सकाळच्या नाष्टामध्ये खाऊ शकत नसतो?

-जेवण ही एक अशी गोष्ट आहे जी आपण सकाळच्या नाष्टामध्ये खाऊ शकत नसतो.

(दुपारी जे आपण बारा वाजेनंतर करत असतो त्याला जेवण म्हणत असतात त्याला नाष्टा म्हटले जात नसते.कारण आपण सकाळी सकाळी करतो त्याला नाश्ता(breakfast) म्हणतात.आणि जेवणाच्या वेळेला जे आपण अन्न प्राशन करतो त्याला जेवणच म्हटले जात असते नाष्टा कधीच म्हटले जात नसते.)

See also  डाँक्टरांविषयी माहीती - डॉक्टर डे माहिती- Doctors Information In Marathi

6) कुठलाही तडा जाऊ न देता आपण काँक्रेटच्या जमिनीवर अंड कसे आपटु शकतो?

-पहिली गोष्ट म्हणजे हा प्रश्नच चुकीचा विचारण्यात आला आहे की कुठलाही तडा जाऊ न देता आपण काँक्रेटच्या जमिनीवर अंड कसे आपटावे?कारण काँक्रेटची जमीन इतकी देखील कमजोर नसते की तिच्यावर जर अंड आपटले तर तिला तडा पडेन.

(आपल्याला विचारलेल्या प्रश्नाला आपण किती गांभीर्याने ऐकतो तसेच समजून घेतो हे बघण्यासाठी याचे परीक्षण करण्यासाठी मुलाखतीत असे प्रश्न विचारले जात असतात.)

7) असा कुठला पक्षी आहे जो जिभेने कुठलीही गोष्ट न चाखता पायाने चाखत असतो?

-फुलपाखरू हा एक असा पक्षी आहे जो जिभेने कुठलीही गोष्ट न चाखता पायाने चाखत असतो.

8) असा कोण आहे जो आपल्या डोळयासमोर बुडत असतो पण आपण त्याला वाचवायला जाऊ शकत नसतो?

-ह्या प्रश्नाचे उत्तर सुर्य हे आहे कारण सुर्याचा रोज आपल्या डोळयासमोर उदय होतो आणि अस्त(बुडतो) देखील होतो पण आपण त्याला बुडताना म्हणजेच अस्त होताना पाहुन वाचवायला जाऊ शकत नाही त्याला बुडताना थांबवू शकत नसतो.

(साहजिकच आहे आपण शारीरीक दृष्टया तंदुरस्त असु आपले हात पाय नीट काम करत असतील आणि आपल्या समोर जर कोणी मनुष्य पाण्यात बुडत असेल तर माणुसकीच्या नात्याने आपण त्याला वाचवायला जाणारच आहे.पण आपल्या डोळयासमोर जर सुर्य बुडत असेल तर आपण त्याला वाचविणे शक्यच नाही कारण हे निसर्गाच्या प्रकृतीच्या नियमाविरूदध आहे जे कधीही शक्य होऊ शकत नाही.)

9) कोणती अशी गोष्ट आहे जिची बाजारात खाण्यासाठीच विक्री केली जात असते पण तिची कुठल्याही शेतात पेरणी केली जात नाही?

-जेवण करण्याचे ताट ही एक अशी गोष्ट आहे जी बाजारात विक्रीला असते जिचा वापर आपण अन्न वाढण्यासाठी आणि अन्न खाण्यासाठीच करतो पण याची कुठल्याही शेतात पेरणी होत नसते.

10) अशी कोणती वस्तु आहे जी आपण जेवढी अधिक स्वच्छ करतो ती आपल्याला तेवढीच अधिक काळी दिसत असते?

See also  आरोग्य म्हणजे काय ? What is good Health Marathi meaning

-शाळेत लहान मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक ज्याचा लेखनासाठी वापर करतात तो फळा म्हणजेच ब्लँक बोर्ड.

(आपल्याला सर्वानाच माहीत आहे की ब्लँक बोर्डचा रंग काळा असतो आणि त्यावर आपण सफेद खडुने लिहत असतो त्यामुळे ब्लँक बोर्डवर जर धुळ बसली किंवा त्यावर लिहिलेला मजकुर फडक्याने पुसुन आपण ब्लँक बोर्ड पुर्ण स्वच्छ केला तरी तो शेवटी आपणास काळाच दिसत असतो.)

11) असे कोणते फळ आहे जे आपण कुठल्याही बाजारात खरेदी करू शकत नाही?

-मेहनतीचे,कष्टाचे आणि कर्माचे फळ हे एक असे एकमेव फळ आहे जे आपणास कुठल्याही बाजारात खरेदी करता येत नसते.

(कुठल्याही कामातील आपल्या मेहनतीचे,कष्टाचे कर्माचे फळ देणे हे युनिवर्सच्या हातात असते ते आपल्याला किती द्यायचे आणि कधी द्यायचे हे पुर्णपणे युनिवर्स ठरवत असते,हे एकमेव असे फळ आहे जे जगाच्या कुठल्याही बाजारपेठेत उपलब्ध होत नाही.)

12) कोंबडी अंड देते आणि गाय आपणास दुध देत असते पण या दोन्ही वस्तु आपल्याला कोण देत असते?

-मित्रांनो जसे की आपल्याला माहीत आहे कोंबडी ही अंड देत असते आणि गाय ही आपणास दुध देण्याचे काम करत असते पण या दोन्ही वस्तु आपल्याला एक विशिष्ट व्यक्ती म्हणजेच दुकानदाराकडुन प्राप्त तसेच उपलब्ध होत असतात.कारण तोच ह्या दोन वस्तुंची त्याच्या दुकानात दररोज विक्री करत असतो.

13) ओळखा पाहु अशी कुठली गोष्ट आहे जी महिन्यातुन एकदाच येत असते.आणि दिवसातील 24 तासाचा कालावधीनंतर संपुन जात असते.आणि नंतर त्या महिन्यात कधीच येत नाही?

-मित्रांनो तारीख(date) ही एक अशी गोष्ट आहे जी दर महिन्यातुन एकदाच येत असते.आणि दिवसाचा चोवीस तासाचा कालावधी संपल्यावर ती तारीख निघून जात असते कारण त्यानंतर दुसरी तारीख येत असते.

14) जगातील असे कुठले राष्ट आहे जिथे एक सुदधा साप दिसुन येत नाही?

-न्युझीलंड हे जगातील एक असे राष्ट आहे जिथे एक सुदधा साप आढळुन येत नाही.

2 thoughts on “आय ए एस मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न – उदाहरण – IAS Interview Questions In Marathi”

Comments are closed.