महाराष्ट्र कृषी दिनाविषयी माहीती – Maharshtra Krishi Din information in Marathi

महाराष्ट्र कृषी दिनाविषयी माहीती

महाराष्टातील एक प्रमुख व्यवसाय आहे.येथील अधिकतर लोक शेती हाच व्यवसाय करतात.महाराष्टच नव्हे तर आपल्या पुर्ण देशाचीच अर्थव्यवस्था आज शेतीवर अवलंबुन आहे.

आज आपला शेतकरी शेतात दिवसभर राबतो तेव्हा आपल्याला अन्न प्राप्त होत असते.म्हणुन आपला भारत देश हा एक कृषीप्रधान म्हणजेच शेतकरींचा देश म्हणुन ओळखला जातो.

आजच्या लेखात आपण आपल्या महाराष्ट्रातील शेतकरयांसाठी दरवर्षी साजरा केला जात असलेल्या असलेल्या एक अत्यंत महत्वाच्या दिनाविषयी माहीती जाणुन घेणार आहे ज्याचे नाव आहे महाराष्ट कृषी दिवस.

चला तर मग जाणुन घेऊया ह्या दिवसाविषयी अधिक सविस्तरपणे.

1)महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो?

1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जात असतो.1 जुलै ते 7 जुलै हा कालावधी कृषी सप्ताह म्हणुन दरवर्षी साजरा केला जात असतो.

2) महाराष्ट्र कृषी दिन का साजरा केला जातो?यामागचा इतिहास काय आहे?

महाराष्ट्र कृषी दिन हा दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्टातील हरित क्रांतीचे जनक म्हणुन ओळखले जात असलेल्या महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी शेतकरयांसाठी दिलेल्या त्यांच्या अमुल्य योगदानाच्या आठवणीत दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो.

वसंतराव नाईक यांनी शेतकरयांच्या शेतीविषयक समस्या हाताळल्या होत्या.ज्यात त्यांनी आपले मुख्य लक्ष महाराष्टामधल्या धान्याच्या समस्या सोडविण्याकडे दिले होते.महाराष्ट धान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण व्हावा यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले होते.वेळप्रसंगी त्यांनी महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण न झाल्यास मी फाशी घेईल असे देखील स्पष्टपणे ठामपणे सांगितले होते.यावरून आपणास कळुन येते की त्यांच्या मनात शेती आणि शेतकरी या दोघांविषयी किती कळकळ होती.हे दोघेही त्यांच्या किती जिव्हाळयाचे होते.

See also  सदोष मनुष्य वधाचा गुन्हा म्हणजे काय?हा गुन्हा कधी दाखल केला जातो? - Sadosh manushyvadh

आणि ही क्रांती घडवून आणत असताना फार मुबलक साधने तेव्हा उपलब्ध होती.परिस्थिती देखील खुप प्रतिकुल होती.तरी देखील वसंतराव नाईक यांनी ही शेती क्षेत्रामधील क्रांती घडवून आणली होती.

3)वसंतराव नाईक कोण होते?

वसंतराव नाईक हे महाराष्ट राज्याचे तिसरे मुख्यमंत्री होते ते महाराष्टातील हरित क्रांतीचे जनक म्हणुन देखील प्रसिदध आहेत.याचसोबत ते एक कुशल शेतीतज्ञ आणि हाडाचे शेतकरी देखील होते.म्हणुनच वसंतराव नाईक यांच्या मनात शेती शेतकरी बांधव यांच्याविषयी खुप कळकळ होती.

वसंतराव नाईक यांचा जन्म कधी अणि कोठे झाला?

वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै रोजी 1993 मध्ये यवतमाळ जिल्हयामधील पुसद नावाच्या एका छोटयाशा खेडेगावात एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला.

वसंतराव नाईक यांचे शिक्षण –

● वसंतराव नाईक यांचे सुरुवातीचे शिक्षण वेगवेगळया खेडेगावांत झाले.विठोली आणि अमरावती शहरात त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पुर्ण केले.

● नागपुरमधील एका काँलेजातुन बीए ची डिग्री प्राप्त केली.याचसोबत त्यांनी एल एलबी देखील केले होते.काही काळ वकिली केल्यानंतर ते पुसद येथील कृषी मंडळाचे अध्यक्ष बनले.यानंतर कृषीमंत्री महसुलमंत्री मुख्यमंत्री अशी अनेक पदे त्यांना प्राप्त झाली.

वसंतराव नाईक यांचा मृत्यु कधी आणि कोठे झाला?

वसंतराव नाईक यांचा मृत्यु सिंगापुर येथे असताना झाला होता.

वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात दिलेले अमुल्य योगदान-

शेतीला आधूनिक स्वरुप प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी एकेकाळी खुप प्रयत्न केले.शेतकरींसाठी त्यांनी राज्यात कृषी विद्यापीठ स्थापित केले.

शेतकरी बांधवांना संकरीत बियाणे उपलब्ध करून दिली.जो अन्नधान्याचा दुष्काळ निर्माण झाला होता त्यांनी त्यावर देखील मात करून दाखवली.

1972 मध्ये दुष्काळाची समस्या निर्माण झाली तेव्हा देखील त्या समस्येला सोडवित त्यांनी शेतकरींना दुष्काळ निवारण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले.

एवढेच नव्हे तर वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्र राज्यामधल्या कृषी विकासाच्या पायाला रोहयो प्रकल्पांतर्गत योग्य दिशा देत मजबुती प्राप्त करून दिली.

म्हणुनच वसंतराव नाईक यांनी शेतकरयांसाठी केलेल्या ह्या कौतुकास्पद आणि अमुल्य कार्याच्या स्मरणात दरवर्षी त्यांचा वाढदिवस हा महाराष्ट्र कृषी दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

See also  भद्राकाळ म्हणजे काय?भद्राकाळात बहिणीने भावाला राखी का बांधु नये?भद्राकाळात राखी बांधणे अशुभ का मानले जाते? -Bhadrakal In Raksha Bandhan 2023

महाराष्ट्र कृषी दिनाचे महत्व काय आहे?

● हा दिवस शेतकरयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारया वसंतराव नाईक यांच्या आठवणीत त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साजरा केला जातो.

● हा दिवस महाराष्टातील सर्व शेतकरी बांधवांच्या शेतीविषयक अडचणी समस्या व्यासपीठावर मांडण्याचा एक उत्तम दिवस आहे.

● या दिवशी शेतकरींच्या समस्यांवर चर्चा केली जाते.शेतकरी बांधवांच्या सर्व शेतीविषयक समस्यांवर मुख्यत प्रकाश टाकला जातो.आणि त्या सोडविण्यासाठी विविध योजना मोहीम शासनाकडुन तयार केल्या जातात.

● शेतकरयांसमोर असलेल्या अडचणींवर विचार केला जातो त्या सोडविण्यासाठी उपाययोजना केली जाते.थोडक्यात हा दिवस महाराष्टातील सर्व शेतकरींना समर्पित दिवस असतो.ज्यात शेती आणि शेतकरी या दोन बाबींचाच विचार केला जातो.