सत्यजित रे यांच्याविषयी काही रोचक तथ्ये -Satyajit Ray birth anniversary. – Satyajit Ray Facts in Marathi

सत्यजित रे यांच्याविषयी काही रोचक तथ्ये amazing facts about satyajit ray in Marathi

Satyajit Ray
Bharat Ratna Satyajit Ray Ji on his birth anniversary.

आज सत्यजित रे यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विषयी काही रोचक तथ्ये जाणुन घेणार आहोत.

सत्यजित रे हे आॅस्कर पुरस्कार विजेते भारतीय लेखक,पटकथा लेखक, संगीतकार निर्माते आणि दिग्दर्शक होते.

सत्यजित रे यांचा जन्म २ मे १९२१ रोजी कोलकाता येथे झाला होता.अणि त्यांचा मृत्यू २ मे १९९२ मध्ये कोककाता मध्ये झाला होता.

आपल्या चित्रपट जगतातील केलेल्या अमुल्य कामगिरीसाठी सत्यजित रे यांना १९९२ मध्ये जीवनगौरव आॅस्कर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

हा जीवनगौरव आॅस्कर पुरस्कार प्राप्त करणारे सत्यजित रे हे एकमेव भारतीय दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात.

सत्यजित रे यांचा कोणताही चित्रपट आॅस्कर साठी नामांकित करण्यात आला नसताना देखील त्यांना आॅस्कर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

असे सांगितले जाते की सत्यजित रे यांना आॅस्कर पुरस्कार देण्यात आला तेव्हा कोलकता येथे आजारी अवस्थेत होते तेव्हा अँकॅडमी अवाॅडचे सभासदांनी त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन त्यांना हा पुरस्कार दिला होता.

सत्यजित रे यांना आतापर्यंत भारतरत्न तसेच दादासाहेब फाळके अॅकॅडमी हुनररी अवाॅर्ड देऊन सन्मानित करण्यात आले होते.

सत्यजित रे यांना भारतीय चित्रपट सृष्टीत एक असा चित्रपट निर्माता दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात ज्यांनी आपल्या निर्माण केलेल्या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक विशेष ओळख प्राप्त करून दिली.

सत्यजित रे यांच्या वडिलांचे नाव सुर्यकुमार राय अणि आईचे नाव सुप्रभा राय असे आहे.

सत्यजित रे यांच्या पत्नीचे नाव बिजोया राय अणि मुलाचे नाव संदीप राॅय असे आहे.

सत्यजित राय यांनी कंप्लीट अॅडव्हेंचर आॅफ फेलुडा हे पुस्तक देखील लिहिले होते.

सत्यजित राय यांचे आजोबा उमेंदर किशोर रे वैज्ञानिक होते अणि त्यांचे वडील सुर्यकुमार राय हे एक लेखक होते.

See also  Budh Pradosh Vrat 2023 In Marathi : आज बुद्ध प्रदोष व्रत, पुजा मुहूर्त तुम्हाला हे सर्व माहित असणे आवश्यक

सत्यजित रे यांचा पहिला चित्रपट पांथेरी पांचाली हा होता ज्याने त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त करून दिली होती.यानंतर त्यांनी चारूलता नायक आगंतुक असे अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती केली.

१९९२ मध्ये सत्यजित रे यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन देखील सन्मानित करण्यात आले होते.याव्यतीरीक्त अजुन ३२ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन त्यांचा आतापर्यंत गौरव करण्यात आला होता.

सत्यजित रे यांच्या आठवणीत तसेच स्मरणार्थ चित्रपटात उत्तम कामगिरी करण्यासाठी सत्यजित रे लाईफटाईम अॅचीव्हमेंट पुरस्कार देखील दिला जातो.

सत्यजित रे यांच्या करिअर मधील शेवटचा चित्रपट आगंतुक हा होता ज्याची निर्मिती १९९१ मध्ये करण्यात आली होती.