न्य इंडिया लिटरेसी प्रोग्रॅम म्हणजे काय?New India literacy programme scheme information in Marathi

न्युज इंडिया लिटरेसी प्रोग्रॅम म्हणजे काय?New India literacy programme scheme information in Marathi

एन आय एलपीचा फुलफाॅम काय होतो?NILP Full form in Marathi

एन आय एलपीचा फुलफाॅम new india literacy programme असा होतो.नवभारत साक्षरता कार्यक्रम यालाच आपण इंग्रजीमध्ये न्यु इंडिया लिटरेसी प्रोग्रॅम असे देखील म्हणू शकतो.

आज अन्नपुर्णा देवी ज्या शिक्षण राज्य मंत्री आहेत त्यांनी राज्यसभेत बोलताना एक अत्यंत महत्त्वाच्या केंद्र पुरस्कृत योजना तसेच कार्यक्रमा विषयी माहीती दिली ह्या कार्यक्रमाचे नाव आहे नवभारत साक्षरता कार्यक्रम.

आजच्या लेखात आपण ह्याच नवभारत साक्षरता कार्यक्रमाविषयी थोडक्यात अणि मुद्देसूदपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

नवभारत साक्षरता कार्यक्रम म्हणजे काय? New India literacy programme meaning in Marathi

New India literacy programme scheme information in Marathi

१५ वर्षांपेक्षा अधिक वयोमर्यादा असलेले व्यक्ती जे साक्षर होण्यामध्ये शिक्षण प्राप्त करण्यामध्ये अद्याप पिछाडीवर राहीलेले आहेत अशा व्यक्तींना देखील शिक्षण प्राप्त करण्याची संधी प्राप्त करून देण्यासाठी.

तसेच यांना देखील इतरांप्रमाणे पुर्णपणे साक्षर बनविण्यासाठी भारत सरकारच्या वतीने २०२२ ते २०२७ मध्ये न्यु इंडिया लिटरेसी प्रोग्रॅम हा कार्यक्रम तसेच योजना सुरू करण्यात आली आहे.

नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा मुख्य हेतु काय आहे?

न्यु इंडिया लिटरेसी प्रोग्रॅम ह्या योजनेचा मुख्य हेतु भारत देशाला पुर्णपणे साक्षर बनविणे हा आहे.भारतातील निराक्षरता दुर करणे हा आहे.याचसोबत प्रौढ शिक्षणाच्या सर्व पैलूंचा समावेश करणे हा देखील आहे.

सरकारच्या हया योजनेअंतर्गत १५ वर्षे तसेच यापेक्षा अधिक वय असलेल्या सुमारे पाच करोड निराक्षर व्यक्तींना कव्हर केले जाणार आहे.

See also  एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढली जाईल आरटीई प्रवेशाची लाॅटरी - RTE Lottery result date in Marathi

भारतातील पंधरा तसेच त्यापेक्षा अधिक वयोगटातील प्रौढ निराक्षर व्यक्तींना साक्षरतेसाठी प्रोत्साहन देणे हा देखील मुख्य हेतु शासनाचा ही योजना राबविण्यामागे आहे.

नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे?

नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या कार्यक्रमाअंतर्गत निराक्षर व्यक्तींना फक्त मुलभुत साक्षरता प्रदान केली जात नाही.

तसेच यात निराक्षर लोकांना फक्त संख्या शास्त्राचे ज्ञान प्रदान करण्यात येणार नाहीये तर ह्या कार्यक्रमा अंतर्गत सर्व प़ंधरा वर्ष तसेच त्यापेक्षा अधिक वय असलेल्या निराक्षरा़ंना सार्वत्रिक शिक्षण प्रदान केले जाणार आहे.

यात मुलभुत शिक्षणासोबत,आजच्या दैनंदिन जीवनात एकविसाव्या शतकात जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली सर्व महत्वाची जीवनावश्यक तसेच व्यावसायिक कौशल्ये देखील शिकवली जाणार आहेत.

ह्या योजनेच्या दवारे सर्व लाभार्थ्यांची ओळख ही घरोघरी जाऊन मोबाईल अॅपच्या माध्यमातून सर्वेक्षण करून केली जात असते.

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही नवभारत साक्षरता योजना स्वयंसेवा तत्वावर आॅनलाईन पदधतीने राबविण्यात येत असते.

म्हणुन‌ ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलाही निराक्षर व्यक्ती सुदधा स्वताहुन कोणाचीही मदत न घेता आॅनलाईन पदधतीने इथे ह्या दिलेल्या अॅपवर जाऊन आपले नाव रेजिस्ट्रेशन करू शकतो.

नवभारत साक्षरता योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?

१५ वर्षे तसेच यापेक्षा अधिक वय असलेल्या निराक्षर व्यक्तींना