रामकृष्ण मिशनची स्थापणा कधी अणि का करण्यात आली होती? Ramkrishna Mission information in Marathi

रामकृष्ण मिशनची स्थापणा कधी अणि का करण्यात आली होती?

रामकृष्ण मिशनची स्थापणा १ मे १८९६-९७ रोजी स्वामी विवेकानंद यांनी केली होती.रामकृष्ण मिशनचे मुख्यालय कोलकता शहरातील बेलुर ह्या ठिकाणी आहे.

वेदांत तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी ह्या मिशनची स्थापणा करण्यात आली होती.रामकृष्ण मिशन मध्ये इतरांची सेवा करणे दान करणे हा आपला कर्मयोग मानला जातो.अणि हेच हिंदु धर्मातील महत्वाचे तत्वज्ञान देखील आहे.

स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते.स्वामी विवेकानंद यांचे मुळ नाव नरेंद्र नाथ दत्त असे होते.

रामकृष्ण मिशनचे ब्रीद वाक्य आत्मनो मोक्षार्थ जगत हिताय असे होते.याचा अर्थ आपल्या आत्म्याच्या उद्धारासाठी आणि जगाच्या हितासाठी असा याचा अर्थ होत असतो.

रामकृष्ण मिशनला १९९६ मध्ये आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते तसेच भारत सरकारच्या वतीने १९९८ मध्ये देखील गांधी शांतता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

रामकृष्ण मिशनची स्थापणा का करण्यात आली होती?

रामकृष्ण मिशनची स्थापणा स्वामी विवेकानंद यांनी केली होती.हया मिशनच्या स्थापणेचा हेतू पुढीलप्रमाणे होता

ज्या रामकृष्ण परमहंस यांनी दिलेल्या शिकवणीवर ज्यांची अगाध अशी श्रद्धा आहे.जे रामकृष्ण परमहंस यांची शिकवण जगापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत.

जे साधु तसेच संन्यासी व्यक्ती दुखी तसेच पिडित लोकांची निस्वार्थ भावनेने सेवा करू इच्छित आहे.अशा सर्व साधु तसेच संन्यासी व्यक्ती यांना एकत्रित करणे यांना संघटित करून एकत्र आणने हे उद्दिष्ट रामकृष्ण मिशनची स्थापणा करण्याचे होते.

रामकृष्ण परमहंस यांचे विचार शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचवून लोकांची धार्मिक तसेच अध्यात्मिक प्रगती उन्नती घडवून आणने.

रामकृष्ण मिशनच्या अंतर्गत विविध शाळा महाविद्यालय रूग्णालये चालवली जातात.कृषी संबंधी कला तसेच विविध हस्तकलांचे प्रशिक्षण दिले जाते.

आज भारतातच नव्हे तर परदेशातही रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.

भारताच्या वेदांतशास्त्राचा संदेश पाश्चिमात्य देशांमध्ये पोहोचवण्याबरोबरच भारतीयांची स्थिती सुधारण्याच्या दिशेनेही या संस्थेने आतापर्यंत प्रशंसनीय कार्य केले आहे असे आपणास दिसून येते.

See also  छत्रीवाली Movie -Chhatriwali movie review in Marathi