भारतीय युवा वर्ग भारतीय नागरीकत्वाचा त्याग करून परदेशात का जात आहे? – Why Indians renounced citizenship

Table of Contents

भारतीय युवा वर्ग भारतीय नागरीकत्वाचा त्याग करून परदेशात का जात आहे? – Why Indians renounced citizenship

मित्रांनो गृहमंत्रालयाने नुकतीच संसदेत एक आकडेवारी जाहीर केली आहे.

या मिळालेल्या आकडेवारीनुसार आपणास स्पष्टपणे दिसुन येते की 2021 मध्ये भारतीय नागरीकत्वाचा त्याग करून परदेशात जाणारया युवा वर्गाची संख्या जवळजवळ एक लाख त्रेसष्ठ हजार तीनशे सत्तर इतकी आहे.

आधीच्या वर्षाच्या संख्येशी ह्या संख्येची तुलना जर करण्यात आली तर हे प्रमाण आपणास दुप्पट असलेले दिसुन येईल.

खुप जण भारतीय नागरीकत्वाचा त्याग करता आहे अणि अमेरिका,आँस्ट्रेलिया,युरोप अशा वेगवेगळया देशात स्थायिक होताना दिसुन येत आहे.

अशा वेळी आपल्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो की आपल्या देशातील तरूण भारतीय नागरीकत्व सोडुन परदेशात स्थायिक होऊन तेथील नागरीकत्व का स्वीकारत आहे?परदेशाकडे का वळत आहे?

आजच्या लेखात आपण ह्याच अत्यंत महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकणार आहोत अणि याबाबद अधिक सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.

See also  आनंद महिंद्रा यांच्या विषयी जाणून घ्यायची काही रोचक तथ्ये -Amazing facts about Anand Mahindra in Marathi

भारतीय नागरीकत्वाचा त्याग करून अमेरिकेत स्थायिक होणारया लोकांची एकुण संख्या किती आहे?

भारतीय नागरीकत्वाचा त्याग करून अमेरिकेत स्थायी होणारया लोकांची सध्याची एकुण संख्या साधारणत 78 हजार 283 इतकी आहे.

भारतीय नागरीकत्वाचा त्याग करून आँस्ट्रेलियात स्थायिक होणारया लोकांची एकुण संख्या किती आहे?

भारतीय नागरीकत्वाचा त्याग करून आँस्ट्रेलियात स्थायिक होणारया लोकांची एकुण संख्या साधारणत 23 हजार 530 इतकी आहे.

भारतीय नागरीकत्वाचा त्याग करून कँनडामध्ये स्थायिक होणारया लोकांची एकुण संख्या किती आहे?

भारतीय नागरीकत्वाचा त्याग करून कँनडात स्थायिक होणारया लोकांची एकुण संख्या साधारणत 21 हजार 590 इतकी आहे.

चीन ह्या देशाचे नागरीकत्व प्राप्त होण्यासाठी भारतीय नागरीकत्व सोडणारयांची संख्या किती आहे?

चीन ह्या देशाचे नागरीकत्व प्राप्त करण्यासाठी भारत ह्या देशाचे नागरीकत्व सोडणारया नागरीकांची संख्या एकुण 300 च्या जवळपास आहे.

पाकिस्तान ह्या देशाचे नागरीकत्व प्राप्त करण्यासाठी भारतीय नागरीकत्व सोडणारयांचे प्रमाण किती आहे?

पाकिस्तान ह्या देशाचे नागरीकत्व प्राप्त करण्यासाठी भारतीय नागरीकत्वाचा त्याग करणारया लोकांचे प्रमाण 40 इतके आहे.

युरोपचे नागरीकत्व स्वीकारणारया लोकांची संख्या कमी का झाली आहे?

युरोप ह्या देशाने आपले नागरीकत्वाचे अणि स्थलांतराबाबतचे कायदे खुपच कडक करून टाकले आहेत.म्हणुन भारतातुन युरोपात स्थलांतरीत करणारया,युरोपियन नागरीकत्व स्वीकारणारया भारतीयांचे प्रमाण कमी झाले आहे.

मागील पाच वर्षात किती भारतीय तरूणांनी भारतीय नागरीकत्वाचा त्याग केला आहे?

मागील पाच वर्षात 8 लाखापेक्षा अधिक भारतीय तरूणांनी भारताचे नागरीकत्व सोडुन परदेशात स्थायिक झाले आहे.तेथील नागरीकत्व स्वीकारले आहे?

मागील काही एक दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांचे स्थलांतर करणे,फिरणे,परदेशात जाणे बंद करण्यात आल्यामुळे हा आकडा इतका आहे असे सांगितले जात आहे.

म्हणजेच यापेक्षा अधिक आकडा आपल्यास भविष्यात पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय तरूण वर्ग भारत देश सोडुन परदेशात गेल्यास काय होऊ शकते?

  • आपल्या भारताच्या उज्वल भविष्याची जबाबदारी ही आजच्या तरुण पिढीच्या खांद्यावर आहे.अणि जर दिवसेंदिवस भारतातील तरूण वर्ग परदेशी नागरीकत्व स्वीकारू लागला तर आपल्या देशाचे भविष्य धोक्यात येऊ शकते.
  • अणि जर देशातील सर्व उच्च शिक्षित कौशल्याने निपुन कुशल तरुण वर्ग जर परदेशात गेला तर भारतात कुशल अणि उच्चशिक्षित तरूणांची कमतरता भासु लागेल.तुटवडा निर्माण होईल.
See also  VPN म्हणजे काय ? मराठी माहिती

भारताची तरूण पिढी देश सोडुन परदेशात का जाते आहे?

  • आता आपल्याला मुख्य प्रश्न असा पडतो की भारतातील तरुत वर्ग अधिक प्रमाणात भारत देश सोडुन परदेशात स्थायी का होतो आहे?तेथील नागरीकत्वाचा स्वीकार का करतो आहे?
  • असे निदर्शनास आले आहे की भारत देशाचे नागरीकत्व सोडुन परदेशातील नागरीकत्व स्वीकारत असलेले जेवढेही तरूण तरूणी आहेत ते उच्च शिक्षित अणि आपापल्या शिक्षण घेतलेल्या क्षेत्रात उत्तम कलेने कौशल्याने निपुन आहेत.
  • तर जेव्हा भारतीय तरूणांना आपण देश सोडुन परदेशात शिक्षणासाठी,नोकरीसाठी का जात आहे असे विचारण्यात आले तर अनेक तरुणांनी याबाबद असे उत्तर दिले आहे की अमेरिका,कँनडा ह्या देशातील स्टँडर्ड आँफ लिव्हिंग म्हणजेच येथील राहणीमान वातावरण फारच उत्तम आहे.
  • येथे मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण प्राप्त होते.नोकरीच्या संधी देखील येथे विपुल प्रमाणात आहे.नोकरीत कर्मचारींना उच्च वेतन दिले जाते.
  • जितके काम आपण करतो त्या बदल्यात त्यानुसार उत्तम वेतन दिले जाते.येथील काम करण्याचा कालावधी देखील निश्चित असतो.जास्त वेळ काम केल्यास आपणास अधिक मोबदला प्राप्त होतो.जो भारतामध्ये काम करणारया युवकांना दिला जात नाही.भारतात कामाच्या नियमांचे व्यवस्थित पालन देखील केले जात नाही.त्यामुळे आम्हास नोकरीसाठी पुन्हा भारतात यावे असे वाटत नाहीये.
  • म्हणजेच तरूण वर्ग हा परदेशातील प्राप्त होत असलेल्या उत्तम शैक्षणिक सोयी सुविधा,येथे दिल्या जाणारया चांगल्या सवलती,नोकरीच्या विपुल संधी,आजुबाजुचे चांगले वातावरण,उच्च राहणीमान,नोकरीत मिळणारे उच्च वेतन,तेथील हाय फाय लाईफ स्टाईल,उच्च तंत्रज्ञानाचे शिक्षण या कारणामुळे परदेशाकडे अधिक तरूण वर्ग वळत आहे असे आपणास स्पष्टपणे दिसुन येते.
  • याचसोबत बहुतेक तरुण वर्ग दुबई,आ़्यलँड,कँरेबियन बेट इत्यादी देशांत जात आहे.
  • स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या भरपुर संधी तरूणांना येथे प्राप्त होत आहेत.अणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे येथील उद्योग व्यवसाय विषयक नियम कायदे एवढे कडक नाहीत त्यात शिथिलता आहे म्हणून काही तरूण वर्ग ह्या देशांचे नागरीकत्व स्वीकारत आहे.ह्रा देशात व्यवसाय करीत आहे,येथे व्यवसाय प्रक्षिक्षणासाठी सुदधा जात आहे.
See also  मिताली राजने - महिला क्रिकेटपटु ने तोडले सचिन तेंडुलकरचे रेकाँर्ड - Mitali Raj cricket player

ब्रेन ड्रेन कशाला म्हणतात?

जेव्हा एखाद्या देशातील कुशल अणि प्रशिक्षित कामगार वर्ग आपला देश सोडुन काम मिळण्यासाठी दुसरया देशात जातो आपल्या बुदधीमत्तेचा कलेचा कौशल्याचा उपयोग ते दुसरया देशाच्या विकासासाठी करणार असतात.त्याला ब्रेन ड्रेन असे म्हटले जाते.

भारतीयांनी देशाचे नागरीकत्व कायमचे सोडु नये यासाठी आपण काय उपाययोजना करायला हव्यात?

भारतीयांनी देशाचे नागरीकत्व सोडु नये म्हणुन भारताने दुहेरी नागरीकत्वाचा कायदा सुरू करायला हवा.

तरूण वर्ग ज्या उच्च शैक्षणिक नोकरीविषयक सोयी सुविधेच्या अभावाने परदेशात जात आहेत त्या सर्व सोयी सुविधा सवलती त्यांना भारतात उपलब्ध करून दिल्या जाव्यात.

उदा,उच्च वेतन,उत्तम अणि दर्जेदार शिक्षण,भरपुर अणि विपुल प्रमाणात नोकरीच्या संधी,इत्यादी.