हनुमान चालीसा मराठीत अर्थ – hanuman chalisa marathi meaning

हनुमान चालीसा मराठीत अर्थ – Hanuman chalisa Marathi meaning

१)श्रीगुरू चरण सरोज रज,निज मन मुकुर सुधारि।
बरनऊ रघुबर विमल जसु,जो दायकु फल चारी।।

अर्थ -श्रीगुरू महाराजांच्या चरण कमळाच्या दुळीने
आपल्या मनरूपी आरशास पवित्र करून श्री रघुविरांचे
निर्मल यशाचे वर्णन करत आहोत.जे चारी फल धर्म,अर्थ,काम मोक्ष प्रदान करणारे आहेत.

२)बुदधिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार।
बल बुदधी बिदया देही मोही,हरसु कलेस बिहार ।।

अर्थ -हे पवनकुमार मी आपले सुमिरन करतो.माझे शरीर अणि बुदधी निर्बल असल्याचे आपण जाणता.मला शारीरिक बळ समृद्धी आणि ज्ञान देऊन माझ्या दुःख अणि दोषांचे नाश करा

३) जय हनुमान ज्ञान गुणसागर।
जय कपिस तिहु लोक उजागर ।।

अर्थ – श्री हनुमान जी आपला विजय असो आपले ज्ञान अणि गुण अताह आहे.हे कपेश्वर आपला जय असो तिन्ही लोक अर्थात स्वर्ग लोक,भुलोक,अणि पाताल लोकात देखील आपली किर्ती आहे.

४)रामदुत अतुलित बल धामा।
अंजनी-पुत्र पवन सुत नामा।।

महाबीर विक्रम बजरंगी।
कुमती निवार सुमती के संगी।।

अर्थ -हे पवनसुत अंजनीनंदन आपल्या सारखे दुसरे शक्तीशाली कोणीही नाही.

हे महावीर विक्रम बजरंगी आपणात विशेष पराक्रम आहे.तुम्ही अशुद्ध बुदधी दूर करणारे अणि शुदध बुदधी प्रदान करणारे आहात.

hanuman chalisa marathi meaning
Hanuman chalisa Marathi meaning

५) कंचन बरन बिराज सुबेसा।
कानन कुंडल कुंचित कैसा।
हाथ बज्र ओ ध्वजा बिराजै।
कांधे मुज जनेऊ साजे।
संकर सुवन केसरी नंदन।
तेज प्रताप महाजग बन्दन।।

अर्थ -आपण सोनेरी रंग,सोनेरी कपडे,कानात कुंडल अणि कुरळे केसांनी सुशोभित आहात.आपल्या बज्र अणि ध्वजा आहे.खांदयावर मुंजीच्या जानवांची शोभा आहे.

शंकराचे अवतार हे केशरीनन्दन आपल्या पराक्रमाची अणि महान यशाची संसारभरात वंदना होते.

६) विद्यावान गुणी अति चातुर।
राम काज करीबेको आतुर।

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया।
रामलखन सीता मन बसिया।
सुक्ष्म रूप धरी सियही दिखावा।
बिकट रूप धरी लंक जरावा।।

अर्थ -आपण प्रकांड विद्येचे ज्ञाता आहात.गुणवान अणि अत्यंत कार्यकुशल होऊन श्रीरामांचे काम करण्यात उत्सुक असतात.

आपण श्रीराम चरीत्र ऐकण्यात रस घेता.श्रीराम, लक्ष्मण सीता हे आपल्या हृदयात वास करतात.आपण आपले लहानसे रूप धारण करून सीतेला दाखवले अणि भयावह रूप घेऊन लंकेला दहन केले.

See also  जागतिक बौद्धिक संपदा दिवस, थीम, इतिहास, महत्त्व । World Intellectual Property Day In Marathi

७) भीम रूप धरी असुर सहारे।
रामचन्द्र के काज सवारे।
लाय संजीवन लखन जियाये।
श्रीरघुबीर हरषी उर लाये।
रघुपति किन्ही बहुत बढाई।
तुम मम प्रिय भरतही सम भाये।।

अर्थ -आपण विक्राळ रूप घेऊन राक्षसांचे वध केले.श्रीराम चंद्रांच्या उददेशांना यश प्राप्त करून दिले.आपण संजीवनी बुटी आणुन लक्षमणांचे प्राण वाचवले.ज्याने आनंदी होऊन श्रीरामाने आपणास हदयाशी लावले.

श्री रामचंद्रांनी आपली खुप प्रशंसा केली अणि म्हटले की तुम्ही माझ्या भरत सारख्या भावा प्रमाणे आहात.

८) सहस बदन तुम्हरो जस गांवे।
असं कही श्रीपति कंठ लगावै।
सनकादीक ब्रम्हादी मुनीसा।
नारद सारद सहीत अहीसा।।

अर्थ -श्रीरामांनी आपणास हे म्हणून हदयाशी लावले की तुमचे यश हजार मुखाने गाजवण्यासारखे आहे.

श्री सनद,श्री सनातन,श्री सनंदन,श्री सनदकुमार,आदी मुनी ब्रम्हा,आदी देवता नारद, सरस्वती,शेषनाग हे सर्व आपले गुणगान करतात.

९) जमकुबेर दिगपाल जहा ते।
कबि कोबिद कहि सके कहा ते।
तुम उपकार सुग्रीवहि किन्हा।
राम मिलाय राजपद दीन्हा।
तुम्हरो मंत्र बिभीषण माना ।
लंकेस्वर भए सब जग जाना ।।

अर्थ – यमराज कुबेर इतर सर्व दिशांचे रक्षक कवी विद्वान, पंडीत,किंवा कोणीही आपल्या यशाचे पुर्णतः वर्णन करू शकत नाही.

आपण श्रीरामांची सुग्रीवाशी भेट करून उपकार केले ज्यामुळे ते राजा झाले.आपल्या उपदेशांचे बिभिषणाने पालन केले.ज्याने ते लंकेचे राजा झाले हे सर्व जगाला माहीत आहे.

१०) जुग सहस्त्र जोजन पर भानु।
लील्यो ताहि मधुर फल जानु।

प्रभु मुद्रीका मेलि मुख माही।
जलधि लांघि गये अचरज नाही।।

दुर्गम काज जगत के जेते।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।।

अर्थ -सुर्य अती दुर इतक्या अंतरावर आहे की तिथे पोहचण्यास हजार युग लागतात.अशा दोन हजार योजनांच्या अंतरावर स्थित सुर्याला आपण एक गोड फळ म्हणून गिळुन गेलात.

आपण श्रीराम चंद्राची अंगठी मुखात ठेवून समुद्र पार केला यात आश्चर्य करण्यासारखे नाही.संसारात कितीही अवघड काम असले तरी आपल्या कृपेने ते सोपे होऊन जाते.

See also  संस्कृत दिवस महत्व अणि इतिहास - Sanskrit Diwas Importance And History In Marathi

११) राम दुआरे तुम रखवारे।
होत न आज्ञा बिनु पैसारे।।

सब सुख लहै तुम्हारी सरना।
तुम रक्षक काहु को डरना।।

आपन तेज सम्हारो आपै।
तीनो लोक हांक ते कापै।।

अर्थ – श्रीरामांच्या दारावरील आपण राखनदार आहात.आपल्या आज्ञेशिवाय कोणालाही आत प्रवेश मिळु शकत नाही.

अर्थात श्रीरामांना प्रसन्न केल्याशिवाय श्रीराम कृपा दुर्लभ आहे.आपल्या शरणी येणारा प्रत्येक भक्त आनंद प्राप्त करतो.अणि आपण रक्षा करण्यास असल्यावर भीती राहत नाही.

आपल्या शिवाय आपला वेग कोणीही थांबवू शकत नाही.आपल्या गर्जनांनी तिन्ही लोक थरथर कापतात.

१२) भुत पिशाच निकट नहि आवे।
महाबीर जब नाम सुनावे।।

नासै रोग हरे सब पीरा।
जपत निरंतर हनुमत बीरा।।

संकट ते हनुमान छुडावे ।
मन क्रम बचन ध्यान जो लावै।।

अर्थ -जिथे तुमचे नाव घेतले जाते तिथे भुत पिशाच जवळही फिरकत नाही.हे वीर हनुमान आपला निरंतर जप केल्याने सर्व रोग दुर होतात.सर्व पिडा नाहीशा होतात.

हे हनुमान विचार,कर्म अणि बोलण्यात ज्यांचे लक्ष आपल्यात असते.त्यांना आपण सर्व संकटांपासून मुक्त करतात.

१३) सब पर राम तपस्वी राजा।
तिन के काज सकल तुम साजा।
और मनोरथ जो कोई लावै।
सोइ अमित जीवन फल पावे।।

चारो जुग परताप तुम्हारा।
हे परसिदध जगत उजियारा।।

अर्थ -तपस्वी राजा श्रीरामचंद्र सर्वश्रेष्ठ आहेत.त्यांच्या प्रत्येक कार्याला आपण सोपे केले आहे.ज्यांच्यावर आपली कृपा असते त्यांच्या इच्छेला अशा प्रकारे फलप्राप्ती होते ज्याची मर्यादा सांगता येऊ शकत नाही.

चारी यूगात सतयुग, त्रेतायुगात दवापर युगात अणि कलियुगात आपले यश पसरलेले आहे.जगात आपली किर्ती सर्वत्र प्रकाशमान आहे.

१४) साधु संत के तुम रखवारे।
असुर निकंदन राम दुलारे।।

अष्ट सिद्धी नौ निधी के दाता।
असबर दीन जानकी माता।।

अर्थ -हे श्रीरामाचे लाडके आपण सज्जनांचे रक्षण करता आणि दृष्टांचा विनाश करता.

See also  युजीसी नेट परीक्षेची Answer Key PDF Download | UGC NET Final Answer Key PDF Download

आपल्याला देवी जानकीकडुन असे वरदान प्राप्त आहे की आपण कोणालाही आठ नऊ निधी देऊ शकता

१५) राम रसायन तुम्हरे पासा।
सदा रहो रघुपति के दासा।।

तुम्हरे भजन राम कौ पावे।
जनम जनम के दुख बिसरावै।।

अर्थ -आपण निरंतर श्री प्रभु रामाच्या शरणात राहतात.ज्याच्यामुळे आपल्याकडे वृद्धापकाळ अणि असाध्य आजाराचा नाश करण्यासाठी राम नाम औषधी आहे.आपले भजन केल्याने श्रीराम प्राप्त होतात.अणि जन्म जन्मांतराचे दुख दुर होते.

१६) अंतकाल रघुबर पुरजाई।
जहा जन्म हरी भक्त कहाई।।

और देवता चित्त न धरई।
हनुमत सेइ सर्व सुख करई।।

संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा।।

अर्थ – आपल्या शरणात राहुनच अंतिम काळात वैकुंठात जाता येऊ शकते.अणि तिथे जन्म मात्र हरिभक्ताच्या रुपात मिळतो.

हे हनुमान आपली सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते.आपले स्मरण केल्याने सर्व वेदना संकटे नाहीशी होतात.

१७) जै जै हनुमान गोसाई।
कृपा करहु गुरूदेव की नाई।।

जो सत बार पाठ कर कोई।
छृटहि बंदी महा सुख होई।।

अर्थ – हे स्वामी हनुमान आपली जय असो आपली माझ्यावर श्रीगुरू समान कृपा असावी.शंभर वेळा हनुमान चालीसेचा पाठ केल्याने सर्व बंधनातुन मुक्ती मिळेल.अणि परमानंद प्राप्त होईल.

१८) जो यह पढे हनुमान चालीसा।
होय सिदधि साखी गौरीसा।।

तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजे नाथ हदय मंह डेरा।।

अर्थ -भगवान शंकर साक्षी आहेत की याचे पाठ केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.अणि आपणास निश्चित यश प्राप्त होईल.

हे नाथ हनुमान तुलसीदास सदा हनुमानांचे दास आहेत.म्हणुन आपण त्यांच्या हृदयात वास करा

१९) पवन तनय संकट हरन,
मंगल मुरति रूप।

राम लखन सीता सहित,
हदय बसहु सुर भुप।।

अर्थ -हे संकटमोचनक पवनकुमार आपण आनंद मंगळ स्वरुपात आहात.हे देवराज आपण श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या सह माझ्या हृदयात राहावे हीच माझी ईच्छा आहे.

२०) ।।सिया पति रामचंद्र की जय।।
।।जय श्री राम ।।
।।जय हनुमान ।।